भारत बनवणार 30 हजार कोटींची QRSAM डिफेन्स सिस्टम

भारत सरकार लवकरच स्वदेशी QRSAM (क्विक रिएक्शन सरफेस-टू-एअर मिसाईल) प्रणाली विकसित करणार असून, त्यासाठी तब्बल ३० हजार कोटी रुपयांचा खर्च होणार आहे. ऑपरेशन सिंदूरमध्ये S-400 व आकाशतीर प्रणालीच्या यशस्वी कामगिरीनंतर ही योजना आणखी महत्त्वाची ठरते. संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांच्या अध्यक्षतेखाली होणाऱ्या बैठकीत या प्रस्तावाला मंजुरी मिळण्याची शक्यता आहे. ही मंजुरी ‘एओएन’ (Acceptance of Necessity) म्हणून ओळखली जाते.

QRSAM ही प्रणाली पूर्णतः स्वदेशी असून, डिआरडिओ, भारत इलेक्ट्रोनिक्स आणि भारत डिनामिक्स या कंपन्यांनी संयुक्तपणे तिचा विकास केला आहे. तिची मारक क्षमता २५ ते ३० किलोमीटर असून ती शत्रूच्या विमानं, हेलिकॉप्टर्स, व ड्रोनना क्षणार्धात लक्ष्य करू शकते. चाचण्यांमध्ये ही प्रणाली दिवस-रात्र प्रभावी ठरली आहे. तिला पश्चिम व उत्तर सीमांवर तैनात करण्यात येणार आहे, जेथे पाकिस्तान आणि चीनकडून धोका अधिक आहे.

विश्लेषकांच्या मते, QRSAM मुळे भारताची बहुपातळी हवाई संरक्षण क्षमता अधिक सक्षम होईल. Triumf (380 किमी) आणि Barak-8 (70 किमी) यांसारख्या प्रणालींसोबत ती समन्वय साधत काम करेल. पाकिस्तान व चीनसारख्या शत्रूंना उत्तर देण्यासाठी ही प्रणाली महत्त्वाची ठरेल. भारताची एअर डिफेन्स प्रणाली आता अधिक वेगवान, अचूक आणि स्वयंपूर्ण होणार आहे.

ताज़ा खबर

BCCI ने घरेलू क्रिकेट शेड्यूल 2025-26 किया जारी

राफाल विध्वंस पर पाकिस्तान का दावा झूठा: दसॉ

ईरान को ट्रंप की चेतावनी: हमला किया तो पछताओगे

केदारनाथ हेलिकॉप्टर हादसा: 6 की दर्दनाक मौत